

नौनं छिन्दन्ति शस्त्राणि नौनं दहति पावक:। न चौनं क्लेद्यन्त्यापो न शोषयति मारूत:।।
असं जरी असलं तरीही ङमृत्यूछ म्हटलं की भय, दु:ख, वेदना काही टळत नाहीत.
जगण्यावरचं अपरंपार प्रेम, मोह सुटत नाही.
आयुष्य नको आता असं म्हणणारी माणसं जास्तीत जास्त काळ जगतात.
हे असं चित्रं सर्वत्र दिसतं. विकलांग झालेली शरीरंही खितपत पडतात,
ती अंतर्मनातल्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोशी झालेली ही शरीरं त्रास,
अपमान सहन करतात आणि मग अशांना शांत-चित्त मरण द्यावं अशा विचारांना प्राधान्य दिलं जातं...
आपणहूनच. निर्णय घेतला जातो... मुक्ती दिली जाते...
दयामरण... युथनेशिया...
लेखक : स्वाती चांदोरकर
पृष्ठे : 225
किंमत : 220
No comments:
Post a Comment