
साधीसरळ जीवनशैली असणारी गावाखेड्यातील माणसं आपल्या पध्दतीनं या नव्या बदलांना सामोरं जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; पण बरेचदा अपयशी होतात; या अपयशातून उभं राहण्याची धडपड करतात;बरेचदा कोलमडतातही!
लेखक- नरेंद्र माहुरतले
पृष्ठे- १२८
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसातात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच!
आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागलं.
`इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करु देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं....
No comments:
Post a Comment