

अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो.
व्यक्तिला आयुष्यात नक्की काय हवे असते...
स्त्री-पुरूषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते...
खरे प्रेम म्हणजे काय...
मनोविकारांना आरंभ कसा होतो...
अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का.....
असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय.....
अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंवरीच्या यशाचे खरे गमक दडलेले आहे.
डॉ. अंजली जोशी
मानसोपचार तज्ञ
एका संपन्न, सुस्वरूप आणि सुविद्य स्त्रीच्या स्वभावाचे आणि परिस्थितीच्या मानसिक दडपणामुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त होणा-या तिच्या अंतर्मनाचे चित्रण यात आहे.. स्त्रीच्या मनस्वीतेबरोबरच पुरुषमनाचाही वेध घेण्याच्या लेखकाच्या प्रयत्नामुळे ही केवळ मनोरूगण स्त्रीची आणि उमद्या, कर्तबगार पुरुषाची प्रेमकथा न राहता त्यापलिकडे जाऊन एक सृजनात्मक, मनोवेधी कादंबरी झाली आहे, हे लेखकाचे य़श आहे.
सौ. उमा वि. कुलकर्णी.....अनुवादकाच्या ..चार शब्द.. मधून
मुळ लेखक- डॉ. एस.एल.भैरप्पा
अनुवाद- उमा वि कुलकर्णी
पृष्ठे- ३९२
किंमत- २५०
तिसरी अवृत्ती
No comments:
Post a Comment