Tuesday, August 28, 2012

महात्मा गांधी आणि तीन माकडे



गांधीजींचे आचरण
गांधींजींची वचने


“जो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वतःच घडवला पाहिजे !”
मी काय करु शकतो ? मी तर सामान्य माणूस ! अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत, ते नेहमी म्हणत, हळुवारपणाने तुम्ही जग बदलू शकता ! आणि त्यांनी तसे केले.

आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामर्थ्य़शाली साम्राज्याला स्वतःच्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले.

स्वतंत्र भारत या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकानंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधींजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडविले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रीकरण या पुस्तकात केलेले आहे...

हे पुस्तक वाचून आपणही थोडंसे काही शिकू या!

संपादन- अनु कुमार
अनुवाद- प्रियंका कुलकर्णी
पृष्ठे- १७४
किंमत- १९० रुपये


`मोहनदास करमचंद गांधी` हे नाव एखाद्या प्रकरणाचे शीर्षक, रस्त्याची पाटी, तिकीट आणि पुतळा यांच्यापुरते मर्यादित राहू देऊ नये यासाठी प्रयत्न करा. वाचन करुन त्यांच्या कार्याची आणि वचनांची माहिती करुन घ्या.

ह्या पुस्तकात तुम्हाला त्यांचे कार्य आणि वचन या दोन्हीची माहिती मिळेल. यातून तुम्हाला जाणवेल की, गांधीजींच्या बोलण्यात, लिखाणात, वागण्यात केवढा साधेपणा आढळतो; पण प्रत्यक्षात ह्या गोष्टी इतक्या सहजसाध्य नसतात!

आणि या पुस्तकातून एक माणूस अन् एक महात्मा म्हणून तुम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्याल...



(अनुपम खेर यांच्या पुस्तकातील प्रस्तावनेतून)




Tuesday, August 21, 2012

अंतरीचा दिवा


वि. स. खांडेकर

वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे.
मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता.
आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..


संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे
पृष्ठे- ५८८
किंमत- ५५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.



वि. स खांडेकर १९३६ ते १९६२ या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात पटकथाकार, संवादलेखक आणि गीतकार म्हणून सक्रिय होते. या काळात मराठीत १४, हिंदीत १०, तर तेलगू-तमिळमध्ये प्रत्येकी २ अशा २८ चित्रपटांची निर्मिती झाली.
त्यांच्या अधिकांश पटकथा मूळ होत्या, तर एक-दोन आधारित. विषयांच्या अंगांनी अधिकांश कथा सामाजिक. काही एक पौराणिकही,. सा-या कथा माणुसकी, समता, समाजवाद, मूल्यमहिमा, आदर्शवाद, बोध, ध्येय नि ध्यास इत्यादिंची जपणूक करणा-या होत्या. त्यांच्या पटकथांमागे समाज बदलण्याचं ध्येय आणि ध्यास होता. त्या रंजक करण्यासाठी त्यांनी प्रेम, प्रणयही चित्रित केला; पण ते त्यांचं लक्ष्य नव्हतं. चित्रपट यशस्वी करण्याचं साधन म्हणून, पट रंजक व्हावा म्हणून केलेला तो प्रयत्न असायचा. आधारित कथा मात्र त्यांनी निखळ मनोरंजनासाठी लिहिल्या. पटकथांमध्ये चारित्रिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक द्वंद ठरलेलं. अधिकांश कथा शोकात्म होत्या. काही सुखान्तही. द्वंद्वात सुष्ट, सत्वपक्षाची सरशी ठरलेली. वि.स.खांडेकरांनी आपल्या पटकथा मेलोड्रामा, फॅंटसी, सटायर म्हणून लिहिल्या. कथा जशी घडली तशी लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. अपवाद म्हणून एखादी पूर्वदीप्ती शैलीविकासाची कथाही आढळते. त्यांच्या पटकथा एक विशिष्ट खांडेकरी वळणवाट घेऊन येतात, विकसित होतात.
खांडेकरांचे चित्रपटातील संवाद छोटे, सहज आहेत. त्यांत विचार, विवेक, सिंध्दांत आपसूक असतातच. त्यांची साहित्यातील सुंदर शब्दकळा इथेही भेटते. अनुप्रास, उपमा हा संवादाचा अविभाज्य भाग असतो. संवादात खोच, कोपरखळी, कोटीही असते. संवादातून कथाविकास, चरित्रचित्रण होत राहतं. नाटककाराचा मूळ पिंड असेलेले खांडेकर कथेत संवादातून नाटकीय प्रसंगांची पेरणी चपखलपणे करीत तो खुलवत राहतात.
प्रसंगानुरूप गीत, गाण्यांची रचना करण्यात वि. स. खांडेकर वाकबगार होते. प्रसंगानुकूल गीतरचना हे त्यांच्या चित्रकथाचं वैशिष्ठ्य. त्यांची गीतं ही प्रेम, प्रणय, निसर्ग, भाव यांचे वर्णन करीत विकसित होतात. गीतं लयबध्द असतात तशीच नादमधुरही, ती छंदयुक्त अधिक, काही कथांमध्ये त्यांनी अन्य प्राचीन आणि समकालीन कवींच्या रचनांचा उपयोग करण्याचा द्रष्टेपणा दाखविला. या रचनेनं त्यांचे चित्रपट बोधगम्य आणि रम्य होण्यास साह्य झालं आहे.



( पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनः डॉ. सुनीलकुमार लवटे)

Thursday, August 16, 2012

याला जीवन ऐसे नाव




इतिहासात डोकवा, जी मंडळी आशावादी होती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढलेला दिसेल.
शिवाजी महाराजांचे उदाहरण पहा. प्रचंड आशावादी होते म्हणूनच हातात काहीही नसताना सुध्दा
विजापूर आणि मोगल हया दोन मोठ्या साम्राज्यवाद्यासी ते य़शस्वी झुंज देऊ शकले.

दुस-या महायुध्दात जर्मनीमध्ये ज्याच्या यातनातळात जी ज्यू मंडळी वाचली ती आशावादी होती.
आठ-नऊ वर्षे त्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली.

कोणाही यशस्वी माणसांचे उदाहरण घ्या., तुम्हाला याच सिध्तांताची प्रचिती येईल.
तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्यही पहा.
जेव्हा जेव्हा कठीण परिस्थितीशी मुकाबला करुन तुम्ही यशस्वी झाला आसाल तेव्हा तुमच्याकडे आशेची शिदोरीच असेल.


लेखक- संजीव परळीकर
पृष्ठे- ७६
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी


तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल.
ह्या पुस्तकात मी छोट्या चौदा गोष्टी लिहल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत,
तर काही प्राण्यांच्या आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यत पोहोचल्या आहेत.

ह्या गोष्टीतून मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहलेच आहे,
पण तेही धडे अमलात आणले तर आयुष्यावर दुरगामी परिणाम काय होतील ते मी सारांशामध्ये लिहले आहे...

(लेखकाच्या प्रस्तावनेतून)

Wednesday, August 15, 2012

द पेशंट



एका रुग्णाचा ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेमधला प्रवास


सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रुस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं, त्याच्याजवळ काय नाही ?
लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी!
त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही.
मात्र, एक पहाटे त्याला लघवीवाटे रक्त जातं. रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात डॉक्टरांच्या भेटीसाठी आठ तास थांबावं लागतं.
ह्या यशस्वी आयुष्यात जोनाथनचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालयं. युरॉलॉजिस्ट डॉ. मोहम्मद खाद्रा त्याच्या संपर्कात येतात. निदान आणि उपचार ह्यांच्या जंजाळात त्याला मूत्राशयाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न होतं; पण डॉ. खाद्रांच्या दृष्टीनं जोनाथन आजाराच्या मानानं तरुण असला, तरी एक सामान्य रुग्ण राहत नाही. त्यांच्या आयुष्यातली साम्यस्थळं दिसू लागतात.
डॉ. खाद्रांचं आयुष्यही एका ठरविक वळणावर जातं, आयुष्यही नश्वर आणि बेभरवशांचं असल्याचं त्यांचा आजार त्यांना शिकवून जातो.
स्वतःच्या मर्त्यपणाची जाणीव झाल्यावर त्या दोघांनाही आजवर लाभलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते.

मुळ लेखक- डॉ. मोहम्मद खाद्रा
अनुवाद- डॉ. देवदत्त केतकर
पृष्ठे- १८०
किंमत- १९० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.


Tuesday, August 14, 2012

गीतांजली



भावानुवादित काव्यसंग्रह

रविंद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व, परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ, एका बाजुला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार
तर दुसरीकडे त्याच्या प्राप्तीची तळमळ, स्वतःच्या उणीवांची आणि मलिनतेची जाणीव , अंतःकरण सूचितेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार ,उपमा, उत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणा-या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-ओहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करुन सहजपणे सांगितलेले जीवनविषयक सत्य व तत्वज्ञान
या सर्वच गोष्टी थक्क करणा-या होत्या.
स्वतः एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्यानी रेखाटलेल्या चित्रासारखे,
काव्यातून नादमय शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची त्यांची हातोटी केवळ अवर्णनिय !

मूळ बंगाली लेखक-रवींद्रनाथ टागोर
भावानुवाद- डॉ. अमिता गोसावी
पृष्ठे- १०८
किंमत- १०० रुपये.



हे छोटंसं फुल पटकन खुडून घे, विलंब करु नकोस ! अन्यथा ते कोमेजून जमीनावर धुळीत पडेल, अशी मला भिती वाटते.
त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल., पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणा-या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे.
मी सावध होण्य़ाआधी बघता-बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भिती वाटते.

या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला , तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे.वेळेतच त्याला खुडून घे.




Monday, August 6, 2012

कार्गोची कणसं




साधीसरळ जीवनशैली असणारी गावाखेड्यातील माणसं आपल्या पध्दतीनं या नव्या बदलांना सामोरं जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; पण बरेचदा अपयशी होतात; या अपयशातून उभं राहण्याची धडपड करतात;बरेचदा कोलमडतातही!

लेखक- नरेंद्र माहुरतले
पृष्ठे- १२८
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी



गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसातात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच!
आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागलं.
`इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करु देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं....

खुलताबादचा खजिना





या घटना आहेत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीच्या. आजही आपल्या महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतातच आणि शहरी भागीतील कौटुंबिक, सामाजिक वातावरणामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. घरापासून लांब असणा-या शाळा, शिक्षणाच्या अपु-या सुविधा, खेळण्याच्या साधनांचा अभाव, मार्गदर्शक व्यक्तींची कमतरता, आधुनिक यंत्रांची आणि तंत्रज्ञानाची अनुपलब्धता आणि कमालीचे दारिद्र्य- हेच दुर्दैवाने आजही ग्रामीण भागातले वास्तव आहे.
`खुलताबादचा खजिना` या पुस्तकाद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील मलामुलींमध्ये असणा-या दरीमध्ये सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यातल्या सर्वच कथांची बीजं ग्रामीण भागातच सापडली. ती बीजं रुजली आणि वाढली मात्र शहरात. परंतु त्यांचा मूळ गाभा नैसर्गीक आणि ग्रामीण आहे. या कथा कुमार, तसचं किशोर गटातील मुलामुलींना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांनाही आवडतील ...

लेखिका- मिरा सिरसमकर
पृष्टे- ६०
किमत- ९५
मुखपृष्ठ व आतली चित्रे - देविदास पेशवे



खट्याळपणा, खोडकरपणा, खेळकर वृत्ती आणि खळाळणारा उत्साह ही सा-याच लहान मुलांची वैशिष्ट्य..
`खुलताबादच्या खजिन्यात` या अशाच गमतीजमती दडलेल्या आहेत. खरं तर यातली मुलं तुम्हाला कुठेतरी भेटलीही असतील !

Sunday, July 15, 2012

स्थूलतेला करा टाटा



डीव्हीडी असलेला मराठीतला पहिला `कॉम्बीपॅक...`





डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे स्थूलते वरील संशोधन पुस्तकरुपाने येत आहे.
आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियामित व्यायाम ही त्रिसूत्री अंगीकारल्यास स्थूलतेवर विजय मिळविणे सोपे जाते.

स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायाला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्ताकामध्ये केला आहे.

स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, धार्मिक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य !

ब-याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम`मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही.
गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास Fat Burn करणारे सोपे व्य़ायामप्रकार या पुस्तकाबरोबरच्या डी.व्ही.डी. मध्ये देण्यात आले आहे.


लेखक- डॉ. आशिष बोरकर आणि डॉ. गौरी बोरकर
पृष्ठे- ८२
किंमत- ९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Saturday, July 14, 2012

इंटरव्ह्यू टेक्निक्स आणि प्रेझेन्टेशन स्किल्स




इंटरव्ह्यू म्हटले की, इंग्रजीतील बोलणे, टाय लावणे, कडक शेकहॅंड करणे, अशा गोष्टींनाच अनावश्यक महत्व दिले जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा-कॉलेजात शिकलेली मुले जे काही इंग्रजी बौलतात, त्यामुळे लहान शहरातील, गावांतील मुले-मुली भारावून जातात. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही याची न्यूनगंड त्यांच्या मनात तयार होतो...

नोकरीसाठी अर्ज कसा लिहावयाचा,
स्पर्धा परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करायची ..


या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये अनभिनज्ञता असते. त्यामुळे अनेकदा ते आपली माहितती प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. म्हणूनच हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये राहणा-या; स्पर्धा परीक्षांची,
इंटरव्ह्यूची तयारी करत असेलेल्या मुला-मुलींसाठी लिहलेले आहे.


इंटरव्ह्यूच्या वेळेला विविध प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, इंटरव्ह्यूच्या वेळेला पाळायचे शिष्टाचार आणि
आवश्यक देहबोली (Body Language) याबद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.



लेखिका- डॉ. अरुणा कौलगुड
पृष्ठे – ८४
किंमत- ९५ रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Friday, July 13, 2012

ई.ई.सी.पी.तंत्र


-हदयावर काबू मिळविण्याचा एकमेव शस्त्रक्रिया-विरहित उपाय
-हदयाचे पुनरुज्जीवन करणारे ई.ई.सी.पी.तंत्र


एनहान्स्ड एक्स्टर्नल काउंटर पल्सेशनबद्दलचे पहिले सर्वसमावेशक गाईड


पेशंटच्या ह्दयात अक्षरशः जान भरणारी शस्त्रक्रियाविरहित उपचारपध्दती....
ई.ई.सी.पी. म्हणजे एनहान्सड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन, ई.ई.सी.पी. बद्दल मी यापूर्वी का ऐकले नाही?
साशंकता, क्षोभ, आश्चर्य व आनंद अशा संमिश्र भावना मिसळलेला हा प्रश्न ह्दयरोग्याचे पेशंट व स्नेहीजन सतत आम्हाला विचारत असतात.
संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेच्या कामाला चालना देऊन ह्दयरोगावर उपचार करणारी ही शस्त्रक्रियाविरहित बाह्य उपचारपध्दती सर्वांना लाभदायक ठरावी. शंभरावर शोधनिबंधांमधून हीचे फायदे निर्विवादपणे सिध्द झालेले आहेत. अशी ही ई.ई.सी.पी. सर्वांपर्यंत पोहोचावी. बायपास-ऑँजिओप्लास्टी इतकीच कार्यक्षमता असणारी ई.ई.सी.पी. अनेक ह्दयग्रस्तांना माहीत व्हावी, हा या अनुवादामागचा मूळ हेतू आहे.
“मी अगदी याचीच वाट पहात होते. मला एक नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं आहे. अंजायना पूर्ण गायब झाला आहे. बरं झालं मी ई.ई.सी.पी. घेतली ”, मधुमेह, रक्तदाब व हार्ट फेल्युअरने त्रस्त असणा-या
चौ-याहत्तर वर्षाच्या मॅडेलिन बाईंचे उदगार असंख्य ह्दयरुग्णांना आशेचा किरण दाखवतील, अशी आशा आहे.


मूळ लेखक- डेबरा ब्रेव्हरमन( एम.डी)
अनुवाद- डॉ. अश्विनी घैसास
पृष्ठे- १५२
किंमत-१६० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Wednesday, July 11, 2012

नेव्हर टू रिटर्न



भटक्या जमातीतील मुलाच्या होरपळलेल्या बालपणाची सत्यकथा

एका हिरावलेल्या बालपणाची अंतःकरण पिळवटून टाकणारी सत्यकथा!

समाजकल्याण खात्यानं सॅंडी रिडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता.
नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सॅंडी रिड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपध्दतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुशष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे.
एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याण खात्याच्या अधिका-यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणा-या मुलांचे पध्दतशीर शोषण करणा-या कुप्रसिध्द `अंकल डेव्ह`च्या मगरमिठीत अडकला.

या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली,एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कसे हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे..या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करुन एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.

मूळ लेखक- सॅंडी रीड
अनुवाद- सुनिता कट्टी
पृष्ठे- २३०
किंमत- २४० रुपये
मुखपृष्ठ- फाल्गुन ग्राफिक्स

Tuesday, July 10, 2012

अण्णा हजारे


भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा


भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराविरुध्द कडक पावले उचलण्यासाठी , भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी आत्तापर्यंत कोणती विधेयके आणण्यात आली, नेमके काय प्रयत्न करण्यात आले, याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरुध्द कडक कायदा आणण्यात ज्यांनी अडथळे आणले त्यांच्याविरुध्द नागरी समाजाचा असलेला रागसुध्दा येथे नोंदविण्यात आला आहे.
नागरी समाजाच्या संतापाचे अण्णा हजारे यांनी व्यापक जनआंदोलनात रुपांतर केले. यामुळे यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणे किती ताताडीचे आणि आवश्यक आहे, हे खासदारांना उमगले. भारतातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार आणि यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा आणि लोकांच्या कल्याणाचा कसा लचका तोडला जात आहे, याचा समग्र आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर गुन्हा करण्या-या लोकांविरुध्द कारवाई करण्यास सध्याच्या कायद्यात कशा त्रुटी आहेत, यावरही हे पुस्तक झगझगीत प्रकाश टाकते.
आधी केले ; मग सांगितले, या न्यायाने अण्णांनी आयुष्यभर कार्य केले. ज्या माणसाला स्वतःचे कुटुंब नाही, संपत्ती नाही, बॅंकेत ठेव नाही, त्याने स्वतःला `फकीर` म्हणवून घेण्यात काहीही आश्चर्य नाही.


संपादक- प्रदीप ठाकूर आणि पूजा राणा
अनुवाद- धनंजय बिजले
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे- १३६
किंमत- १२५ रुपये

Wednesday, July 4, 2012

अनलाईकली हिरो...ओम पुरी





अनलाईकली हिरो ओम पुरी...

या पुस्तकात ओम पुरी यांचे खासगी आयुष्य, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची अस्वस्थता, त्यांच्या ह्दयातील वेदना यांचे दर्शन घडते.

पंजाबातून डोळ्यात स्वप्ने घेऊन आलेला मुखदुर्बळ कलाकार, एनएसडीमधील जातिवंत `फ्लर्ट`, खाण्याचा शौकीन व उत्तम कूक आणि पूर्णतः कुटुंबवत्सल माणूस..ओम पुरी यांची विविध रुपे या पुस्तकात पाहायला मिळतील.

कुटुंबातील सदस्यांबरोबरच्या गमतीदार प्रसंगाची मालिका, भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंच्या सहवासातील अनेक धक्कादायक घडामोडी,प्रेमप्रकराणातील रहस्य यांचा उलगडा या पुस्तकातून होईल. अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ठ्यपूर्ण छायाचित्रांचाही आस्वाद घेता येईल.
मार्मिक,प्रामाणिक आणि उत्साहपूर्ण शौलीत लिहलेली ही कहाणी म्हणजे देशातील एका गुणवंत कलाकाराच्या कार्याचा गौरव आहे.
`सिटी ऒफ जॊय` या चित्रपटात ओम पुरी सोबत काम केलेल्या पॅट्रिक स्वेझ या दिवंगत अभिनेत्याने त्यांच्या त्याच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव पुस्तकात सांगितला आहे.

प्रसिध्द समीक्षक डेरेक माल्कम यांनी ओम पुरी यांची गुणवत्ता आणि कलेचा प्रचंड परीघ यांचा आढावा घेतला आहे.

नसरुद्दीन शाह यांनी `नॅशनल स्कूल ऒफ ड्रामा`पासून सुरु झालेल्या त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या क्षितिजावर ओम पुरी या ता-याचा उदय होण्याची कहाणीही पुस्तकात वाचावयास मिळेल.


मूळ लेखिका- नंदिता सी. पुरी.
अनुवाद- अभिजित पेंढारकर
पृष्ठ- १८४
किंमत- २२० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Saturday, June 16, 2012

क्रिटिकल


वैद्यकीय व्यवसायाच्या अवमुल्यनाची कहाणी

मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना आजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या. ह्या घटनांमध्ये दोघांचा जीव गेला आणि शिवाय हजारो लोकांच्या जीवनांवर गंभीर परिणाम झाले.

या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना असं काही होणार, याची पुसटशीही कल्पना नव्हाती. या तिघांमधला एक गोरा डॉक्टर होता. दुसरा आफ्रिकन-अमेरिकन असून तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होता. तिसरा माणूस आशियाई वंशाचा होता. व्यवसायानं अकाउंटंट असणा-या या तिस-याची निर्घृण हत्त्या झाली होती.

मूळ लेखक- रॉबिन कुक
अनुवाद- प्रमोद जोगळेकर
पृष्ठे- ३५४
किंमत- ३६० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी




रॉबिन कुक यांच्या `क्रायसिस` या कादंबरीत कॉन्सिएर्ज वैद्यकीय पध्दतीच्या सामाजिक परिणामांवर भाष्य होते. स्वतः डॉक्टरांच्या मालकीची स्पेशॅलिटी हॉस्पिटल असणे, हा या कादंबरीचा विषय़ आहे.

अन्जेला डॉसन या हुशार डॉक्टरने आपली प्रॅक्टिस खालावल्यानंतर `एंजल्स हेल्थकेअर` ही कंपनी सुरु केलेली असते. भांडवल बाजारात उतरण्याच्या काही आठवडे अगोदर अन्जेला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना कंपनीच्या हॉस्पिटलांमध्ये संसर्ग फैलावून मृत्यूची मालिका सुरु होते.

याच हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय तपासनिस लॉरी मॉन्टगोमेरीचा नवरा डॅक स्टेपलटन याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने तिला या प्रकरणात वैयक्तिक रस असतो. चौकशी करण्यासाठी लॉरी मॉन्टगोमेरी एंजल्सच्या हॉस्पिटलमध्ये गेल्याने घाबरलेली अन्जेला आपल्या माजी नव-याची मदत घेते. तो कंपनीचा मुख्य भागधारक असलेल्या माफिया डॉनकडे जातो. आपली गुंतवणूक बुडणार या कल्पनेतून माफिया डॉन त्याच्या पध्दतीने काम सुरु करतो.

यामधून कादंबरीतल्या पात्रांवर येणारी संकटे आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या रहस्यमय घडोमोडी वाचकांना खिळवून ठेवतात.

-ख्रिस्तीन हंटली (बुकलिस्ट) हंटली (बुकलिस्ट)

झॅण्ड



मॅनहॅटनच्या ब्लॅक आऊटमध्ये घडलेली रहस्यकथा



लोकप्रिय अमेरिकन लेखिका कॅरोल हिगिन्स क्लार्क हिच्या रेगन रैली मालिकेतील `झॅण्ड`ही एक उत्कंठावर्धक रहस्यकथा. लॉरेन्स लिली ही हॉलीवूडमध्ये पदार्पण करु पाहणारी एक नटी. न्यूयॉर्कच्या जे.एफ.के.विमानतळावरून टॅक्सीतून मॅनहॅटनमधल्या तिच्या घरी परत येत असते. वाटेतच तिचा धनाढ्य नवरा फोन करुन घटस्फोटाची नोटीस देत असल्याचे तिला सांगतो. तेवझ्यात न्यूयॉर्क शहराचा वीज पुरवठा खंडीत होतो आणि संहूर्ण शहर कोळोखात बुडून जाते.
या काळोखात अनेक गोष्टी होत असतात.
एका छोट्या जागेत `स्टॅंड अप कॉमिडीचा` शो बघण्यासाठी वीकएन्डच्या निमित्ताने गर्दी झालेली असते. दोन व्यक्ती लॉरेनच्या घराचे कुलूप तोडण्याच्या खटापटीत असतात.
एका निष्पाप तरुणाला आपल्या जाळ्त फसवून जन्माची अद्दल घडवण्याच्या उद्देशाने एक तरुणी त्याच्या मागे हात धुवून लागलेली असते.
सगळी तरुणाई नाक्यावरच्या बारमध्ये जमा होते.
घरात बसून अंधारात दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने लोक चौकाचौकात जमून `बार्बेक्यू पार्टी` करत धमाल करीत असतात.
ब्लॅकआऊटच्या रात्री वरवर वेगवेगळ्या वाटणा-या या घटनांची सांगड घालत लेखिकेने मोठ्या कौशल्याने एका उत्कंठावर्धक कथानकाची गुंफण केली आहे.
कथानक न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या भागात घडते. जिथे दिवे दिवस असूनसुध्दा चालू असतात. त्या मॅनहॅटनवर आता अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
...रात्र सरत जाते तसा गुंता सुटत जाते आणि हडसन नदीवर सूर्याचे प्रथम किरण पडता-पडता सर्व काही आलबेल होते आणि वाचक सुटकेचा निःश्वास टाकतो.


मुळ लेखक- कॅरॉल हिगीन्स क्लार्क
अनुवाद- जयंत गुणे
पृष्ठे- १३०
किंमत-१४० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Thursday, June 7, 2012

छोटा जवान




सुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युध्दभूमीवर शौर्य गाजविले...
त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला.
भारत-चीन युध्दात शौर्य गाजवताना बाजीरावही...

शौर्याची परंपरा असणा-या मोहित्यांच्या घरातच यामुळे सावट पसरले..

बालपणापासून पराक्रम, शौर्य़ यांच्या कथा ऐकणा-या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला.
आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा छोटा जवान.. निघाला..
सीमेवर..
देशावर निस्सीम प्रेम करणा-या शूरांची ही शौर्य़गाथा...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ४२
किंमत- ४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

जनावनातली रेखाटणे




मी रेषांकडे केव्हा, कसा वळालो ?
आज आठवतं ते इतकंच की, लहान वयातच वळलो.
शब्दांकडे वळण्याआधी रेषांकडे वळलो.
घरात कोणी चित्रकार नव्हते.
कोणामुळे हा नाद लागला ?
काही सांगता येत नाही.
आठवणी उकरु लागल्यावर ध्यानात येतं की,
ही आवड निर्माण व्हायला माझी आई
थोडीफार कारणीभूत झालेली आहे.
रांगोळ्या, गव्हा-तांदळानी भरलेले चौक,
रंगविलेले संक्रांतीचे घट, हिरवी पाने, नारळ,
सुपा-या, खणांच्या घड्या, काचेच्या बांगड्या,
बुक्का, गुलाल, हळद-कुंकू, चैत्रगौरी,
त्यांच्यापुढील आरास, सारवलेल्या अंगणात
रेखलेली पावले...

आकृती, रंग, रेषा किती विविध आणि
सुंदर रुपं मनाला बघायला मिळायची !

मला आज वाटतं,
चित्रकलेचं माझं शिक्षण इथून सुरू झालं...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठावरील रेखाटन- व्यंकटेश माडगूळकर
मुखपृष्ठ, मांडणी व रचना- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

सीताराम एकनाथ




एकनाथबाबानं गाव लेकरागत जपला. त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणार नाही, म्हणून गावं रडलं. त्या सूर्यापोटी हा शनी जन्मला..

सुंद्रा माळिणीसारख्या कैक जणांचे तळतळाट त्याच्या माथी होते आणि तरीही तो तेच काम करीत होता. त्याचं लक्षण खोटं होतं. चिंचाळ्यातली बरी दिसणारी एक बाई सोडली नाही. कुणाच्या जमिनी व्याजात बळकावल्या. कुणाच्या मोटेची चालती बैलं सोडून आणून आपल्या गोठ्यात बांधली. कुणाच्या मळ्यातली झाडं तोडून तिस-याच्या जागेत अरेरावीनं स्वतःचे इमले उठविले!

चिंचाळ्याची उभी रयत त्यानं गांजली. गरीबगाव नाडलं, पिडलं. बापाची पुण्याई, ढीगभर पैका, सरकारदरबारी वजन ह्यामुळं मनातून जळणारं गाव अजून गप्प होतं. पण असं ते किती दिवस गप्प रहाणार?

इतक्या जणांचे तळतळाट माथ्यावर असताना तो किती दिवस जगणार!
धनदौलत, परंपरा कशी जपणार?
इनामदारांच्या घराण्य़ाचा वंशवेल कसा वाढणार?


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३२
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे,२०१२

Wednesday, June 6, 2012

सुमीता



`साहित्य अकादमी पारितोषिक` विजेती श्रेष्ठ कादंबरी The Shadow from Ladakh या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

तू आमचे नेतृत्व कर, असं म्हणून भास्करनं आपल्या हाततातील मशाल सुमीतत्च्या हाती दिली.
गांधीग्रामध्ये प्रवेश करता करता तिच्या हातातील कंदील आपल्या हातात घेतला...
त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे...

प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली,
ती ही नव्हे..
त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच..
हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं;
पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.....


मूळ भारतीय लेखक- डॉ. बी. भट्टाचार्य
अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ३३४
किंमत- ३५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२








Monday, June 4, 2012

जंगलातील दिवस




आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लाबंलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो.
आपलं सगळं जीवन एकता विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे.
कधी अंगावर चांदणे पडत नाही,
कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही.
कधी ओढ्यात अंघोळ होत नाही,
कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही....

मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्रांचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनातील अदभुत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे..
त्याचा हा वृत्तान्त आहे..

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६४
किंमत- १७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२